Saturday, May 31, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उपस्थितीत 'विकसित कृषि संकल्प अभियान' अंतर्गत पेडगाव येथे ड्रोन तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत देशभरात "विकसित कृषि संकल्प अभियान" राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील मौजे पेडगाव येथे दिनांक ३१ मे  रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी अभियानातून शाश्वत शेतीसाठी कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत, कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, याबरोबरच मृदा आरोग्यात पत्रिकेचे आधारे पीक व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांकडे असलेल्या पारंपारिक तंत्रज्ञान यातून चांगली पद्धत निवडून त्यावर संशोधन इतर ठिकाणी पोचविणे हे कार्य साध्य होणार आहे. या अभियानात विद्यापीठ शास्त्रज्ञांचे चमू करून शेतकऱ्यांना  मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या गावात पोहोचत असल्याचे नमूद केले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचा पोत खराब होत असल्याचे सांगून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहनही केले. या अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठाचा “माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत” हे अभियान विस्तृत होत आहे. यातून शेतकऱ्यांनी आपले ज्ञान वाढवावे, विकसित झालेले नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे, असे सांगत शेतकऱ्यांना त्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या शेतीत कसा प्रभावी वापर करता येईल याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा शेतीसाठी योग्य उपयोग कसा करता येईल, यावर प्रकाश टाकला.
नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे डॉ. नरेश मेश्राम व आर. के. सोनकर यांनी संत्रा, मोसंबी आणि लिंबू पिकांचे व्यवस्थापन व समस्यांवर मार्गदर्शन केले.

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेरणीपूर्व मशागत, बियाण्यांची निवड, रुंद सरी-वरंबा पद्धत आणि खत व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे नियोजन कृषी विज्ञान केंद्र, परभणीचे प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांनी केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. ड्रोनच्या माध्यमातून फवारणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला.






वनामकृवित ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीचा उत्सहात समारोप

 

मा कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि 

राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक २९ मे रोजी सुरु झालेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या ५३ व्या  बैठकीच्या उद्घाटन समारंभास राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री, विविध लोकप्रतिनिधी, विद्यापीठांचे कुलगुरू, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, प्रगतशील शेतकरी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. त्यांनी माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सर्जनशील दृष्टिकोनाचे आणि शेतीविषयी असलेल्या आत्मीयतेचे विशेष कौतुक केले. माननीय मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला, हेच शेतीबाबत त्यांच्या जिव्हाळ्याचे द्योतक असून हा उद्घाटन सोहळा राष्ट्रीय स्तरावरही विविध प्रसार माध्यमांद्वारे पोहोचला असून सर्वत्र कौतुक होत आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्र व शेतकरी बांधवांसाठी पिकांचे अधिक उत्पादन देणारे  विविध पिकांचे सुधारित वाण, शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत करणारी सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे आणि एकूणच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी उपयुक्त अशा कृषी तंत्रज्ञानात्मक शिफारसींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या दिनांक २९ ते ३१ मे, २०२५ दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्‍त विद्यमाने आयोजित त्रिदिवसीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या महत्त्वपूर्ण ५३ व्या  बैठकीचा समारोप आज दिनांक ३१ मे  रोजी परभणी येथे विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात  उत्साहात संपन्न  झालेल्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संबोधित होते.

समारोप प्रसंगी उद्घाटक म्हणून राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. शरद गडाख, कृषी परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य श्री विनायक काशीद, श्री जनार्दन कातकडे, कृषी परिषदेचे संचालक संशोधन श्री किशोर शिंदे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विठ्ठलराव शिर्के, परभणी कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, अकोला कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ.विलास खर्चे, परभणीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि पुढे म्हाणाले की, बैठकीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या चर्चासत्रात महाराष्ट्रातील शेतीसाठी महत्त्वाच्या शिफारशीवर निर्णय घेण्यात आले. त्यांनी पिकांच्या आधारभूत किंमतीसाठी हवामान आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या वेळी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री. पाशा पटेल यांच्या भाषणातील प्रभावी शैलीचेही त्यांनी कौतुक केले. श्री. पटेल हे शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बदल घडवून आणणारे व्यक्तिमत्त्व आहे, असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्य हवामानाच्या अनिश्चिततेच्या वाईट स्थितीच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे शेतीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी नियोजन व नवीन तंत्रज्ञान आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने हरितपट्टा तयार करण्यासाठी २ लाख ६० हजार वृक्षांची लागवड केली असून पर्यावरणपूरक विकासाची दिशा ठरवली आहे. माननीय कुलगुरूंनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे कार्य गौरवून, आनंदी राहा, इच्छा, स्पर्धा कमी ठेवा, हेवेदावे टाळा असा सकारात्मक संदेश दिला. विद्यापीठ अधिकारी, शास्त्रज्ञ-केंद्रित प्रशासन चालवत असून त्यांच्या समाधानालाच खरा प्राधान्य दिले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल म्हणाले की, शेतीमाल भाव किंवा शेतीवर होणारे परिणाम यावर कुलगुरू महोदयांनी बोलावे. पिकाची आधारभूत किंमत ठरवण्यासाठी विद्यापीठाने ठोस शिफारशी द्याव्यात. सध्या होत असलेल्या भावाचा आणि आयात निर्यात शुल्काची ही त्यांनी माहिती दिली. सध्या विद्यापीठात सुरू असलेल्या पीक लागवडीचा खर्च काढण्याचे योजनेमध्ये केवळ २५ टक्केच कर्मचारी असल्याने यातून योग्य अनुमान मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे, यावरही चर्चा केली. मागील वर्षी शेतीमध्ये ३६५ दिवसांपैकी ३२२ दिवस आपत्तीचे होते असे एका अभ्यासातून निदर्शनास आले, दिवसभरात देखील वातावरण सारखे नसते, याबरोबरच प्रत्येक पिकाच्या काळात दोन ते तीन वेळा आपत्ती येते अशा या वातावरण बदलामुळे शेती उद्योग धोक्याचा बनतो. फुलांची, फळांची गळ होते आणि उत्पादनात घट येते. यावर चिंतन होऊन शिफारशी मिळणे आवश्यक आहे. कृषी अर्थशास्त्र आणि वातावरण याची सांगड घालून वातावरणावर आधारित कृषी शास्त्र विभागाने अभ्यासपूर्ण शिफारशी द्याव्यात. शेतकऱ्यांनाही वातावरण आधारित तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. बदललेल्या घटकांचा शेती शेती करिता वास्तवामध्ये बदल करण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावा. तापमान वाढ रोखण्यासाठी कार्बनचे प्रमाण योग्य ठेवावे लागेल. यासाठी हरित पट्टे निर्माण करावे लागतील, तसेच कोळसा आणि पेट्रोलचा वापर बंद करावा लागेल आणि याला पर्याय म्हणून बायोमासचा – तूर, कापसाच्या पराठ्या, बांबूचा वापर करावा लागेल. बांबू ३५ टक्के अधिक कार्बन घेतो तसेच त्याचे अनेक उपयोग त्यांनी सांगितले. बांबू लागवडीसाठी महाराष्ट्र शासनाने भरीव तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले शेतकऱ्यांनी पडीक जमीन, बांध, नाल्यावर बांबू लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी कार्बन कमी करून ऑक्सिजन वाढवावे यासाठी शेतीतूनच ऊर्जा निर्मिती व्हावी असे सांगितले.

कुलगुरू मा डॉ. शरद गडाख म्हणाले की ५३ वर्षापासून संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीची ही परंपरा चालू आहे. या बैठकीचा आशय आणि महत्व त्यांनी यावेळी नमूद केला. या शिफारशी राज्यातील विभाग वार रचनेनुसार निर्माण केले जातात. यामुळे महाराष्ट्र देशा कृषी क्षेत्रात अग्रेसर असून देशपातळीवर देखील आपण अन्नधान्य, दूध उत्पादन, अनेक फळ उत्पादन यामध्ये स्वयंपूर्ण झालो आहोत. शाश्वत शेतीसाठी या बैठकीतील शिफारशी उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी लाभदायक ठरतात. तसेच त्यांनी एकात्मिक शेती पद्धतीने महत्त्वाची असल्याचे नमूद केले. देशाची लोकसंख्या सतत वाढत आहे. त्यासाठी शेती उत्पादन वाढवावे लागेल. सध्या पर्जन्यमानाची अस्थिरता, सिंचनाचे स्त्रोत, बाजारपेठ, यांत्रिकीकरणाचा अपुरा वापर, युवकांचा कमी सहभाग, प्रक्रिया उद्योगांची उभारणी ही आव्हाने सध्या आहे. यावर चिंतन आणि संशोधनाची गरज असल्याचे सांगितले. याबरोबरच विद्यापीठे केवळ मागील दहा वर्षातील अद्यावत शिफारशी शेतकऱ्यांना अवलंबण्यासाठी प्रोत्साहित करते. असे नमूद केले. विद्यापीठात मनुष्यबळ कमी झाले तरी देखील संशोधनाचा वेग दुप्पट झाला आहे. परंतु रिक्त जागा भरणे अत्यंत आवश्यक आहे मूलभूत सुविधा जुन्या झाल्या आहेत. याची नूतनीकरणासाठी पुरेसा निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. चारही विद्यापीठाने संपूर्ण जमिनी वहीती खाली आणले आहेत, यासाठी देखील मनुष्यबळाची गरज आहे. या बैठकीस माननीय मुख्यमंत्री, माननीय कृषिमंत्री, माननीय राज्यमंत्री तसेच राज्यातील कृषी क्षेत्रातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

कृषि परिषदेचे सदस्य श्री विनायक काशीद म्हणाले की, लोकसंख्या वाढ होत असली तरी शिल्लक राहील एवढा अन्नधान्य साठा होत आहे. यामध्ये विद्यापीठाचे संशोधन महत्त्वाचे कार्य करत आहे. या बैठकीच्या शिफारशी महत्वपूर्ण असून औद्योगीकरणास उपयुक्त संशोधन भविष्यात व्हावे. यासाठी देश विदेशी शास्त्रज्ञांचा सहभाग वाढवावा. याबरोबरच जुने संशोधन बंद करून नवीन शिफारशीच शेतकऱ्यांना द्याव्यात. कृत्रिम बुद्धिमत्तेला समजून घेऊन योग्य वापर करावा, यातून जागतिक स्पर्धेत राहावे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ हे अनमोल असून, त्यांचे अनुभव नवीन भरती झालेल्या शास्त्रज्ञास उपयुक्त व्हावेत. यासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभावे, अशी निवृत्त झालेल्या शास्त्रज्ञानात त्यांनी विनंती केली.

कृषि परिषदेचे सदस्य श्री जनार्दन कातकडे यांनी विद्यापीठाच्या स्थापनेमुळे अन्नधान्यात स्वयंपूर्णता निर्माण झाल्याचे सांगितले. यामध्ये विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा मोलाचा सहभाग आहे. या शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी पूर्वीप्रमाणेच शास्त्रज्ञांचे निवृत्तीचे वय ६२ वर्ष करण्याची विनंती केली. याबरोबरच छोटे पिकांचे महत्त्व असून त्यांचे तंत्रज्ञान विकसित व प्रसारित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्य वृतांताच्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. चारही विद्यापीठातील यावर्षी निवृत्त होणाऱ्या शास्त्रज्ञाना यथोचित सन्मान करून निरोप देण्यात आला. यावेळी चारही विद्यापीठ आणि कृषी परिषदेच्या शास्त्रज्ञांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केल्या

याप्रसंगी, गत दोन दिवसात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध तांत्रिक सत्रांमध्ये गटनिहाय संपन्न झालेल्या संशोधनात्मक सादरीकरणाचे निष्कर्ष व  गुणवत्ता तसेच सखोल विचार मंथनातून  पिकांचे  सुधारित नवीन आशादायक वाण, शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत करणारी सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे तसेच उपयुक्त कृषी तंत्रज्ञान विषयक शिफारशींना अंतिम मान्यता प्रदान करण्यात येवून शिक्कामोर्तब करण्यात आले. सदर महत्वपूर्ण बैठकीमध्ये राज्यातील एकूण चारही कृषी विद्यापीठे मिळून २५ पिक वाण, १८ यंत्रे व अवजारे तथा २२५ उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञानाना मंजुरी मिळाली असून सदर संशोधन याच हंगामापासून अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान पुढील वर्षी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ५४ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीचे (जॉईंट अग्रोस्कोचे) यजमानपद डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली यांच्याकडे असल्याने विद्यमान यजमान परभणी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.  खिजर बेग यांनी दापोली कृषि विद्यापीठ संशोधन संचालक आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे संशोधन संचालक यांना नारळ देत संयुक्तरीत्या हस्तांतरित केले. 

आभार संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी मानले. कार्यक्रमात चारही कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालकशिक्षण संचालकविस्तार शिक्षण संचालक, वनामकृविचे सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख यांच्यासह तीनशेहून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विना भालेराव आणि डॉ दयानंद मोरे यांनी केले.


कुलगुरू मा डॉ. शरद गडाख

संचालक संशोधन डॉ. खिजर बेग


वनामकृविचे डॉ. मदन पेंडके: मराठवाड्यातून 'उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ' पुरस्काराचे मानकरी

 


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. अॅड. माणिकरावजी कोकाटे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणपाणी पुरवठा व स्वच्छताउर्जामहिला व बालकल्याणसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकरकृषिवित्तनियोजनमदत व पुनर्वसनविधी व न्यायकामगार राज्यमंत्री  मा.ना. अॅड. आशिष जयस्वाल तसेच कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थित वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ मदन पेंडके यांना “उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ २०२५” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण संशोधन परिषदपुणे यांचे संयुक्‍त विद्यमाने राज्यातील चारही कृषि विद्यापीठाची ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती-२०२५ च्या उद्घाटन समारंभात दिनांक २९ मे रोजी प्रदान करण्यात आला.

यावेळी लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य व विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि), कृषि परिषदेचे महासंचालक, कृषि आयुक्त,  पोकराचे प्रकल्प संचालक, चारही विद्यापीठाचे कुलगुरू, परभणीचे सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

शास्त्रज्ञांनी संशोधनात उल्लेखनीय कार्य  केल्याबद्दल “उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ” या पुरस्काराने संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती च्या बैठकीमध्ये सन्मानित करण्यात येते.

डॉ. मदन श्रीधरराव पेंडके यांचा परिचय

डॉ. मदन पेंडके हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी) या पदावर कार्यरत आहेत. ते सध्या विभाग प्रमुख (मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी) म्हणून अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १९९२ पासून अध्यापन, संशोधन व विस्तार सेवा देत आहेत. त्यांनी मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी विषयात पदवी, पदव्युत्तर व आचार्य (डॉक्टरेट) पदवी प्राप्त केली आहे.

शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातील योगदान –

त्यांचे मराठवाडा विभागातील विविध कृषी हवामान विभागांनुसार शेतकऱ्यांचे आकारमान निश्चित करून राज्य शासनासाठी शिफारसी केल्या, मृदा व जलसंधारणाच्या कामांचे मूल्यांकन करून कार्यक्रम ठरवले, बंधारे, विहीर, कुपनलिका पुनर्भरण, मराठवाडा विभागासाठी शेततळ्याची आकार निश्चिती,  हवामान बदलनुरूप तंत्रज्ञान, जलसंधारण पद्धती इत्यादींवर संशोधन, कोरडवाहू शेतीसाठी उपयोगी तंत्रज्ञान तयार करून मराठवाडा प्रदेशात प्रसार केला, १०० हून अधिक संशोधन लेख प्रकाशित, १० पुस्तिकांचे लेखन व ५ पुस्तके प्रकाशित आहेत, तसेच १४ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान-  

त्यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे वसंतराव नाईक पुरस्कार (२०१८), आदर्श शिक्षक आणि राधाकिशन शांती मल्होत्रा पुरस्कार, याशिवाय भारतीय कृषी अभियंता संघटना नवी दिल्ली यांचा संशोधन कार्यासाठी एस जे हिरण पुरस्कार यासह अनेक उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत


Friday, May 30, 2025

प्रधान सचिव मा.श्री. विकासचंद्र रस्तोगी यांची बायोमिक्स संशोधन व निर्मिती केंद्रास भेट; बायोमिक्सच्या यशस्वी प्रयोगांचे कौतुक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील बायोमिक्स संशोधन आणि निर्मिती केंद्रास दिनांक ३० मे रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थित महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री. विकासचंद्र रस्तोगी यांनी भेट देऊन केंद्रातील संशोधन कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बायोमिक्सच्या यशाचे कौतुक करत त्याचे उत्पादन अधिक प्रमाणात वाढवण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, बायोमिक्सचा शेतकऱ्यांमधील विश्वास वाढत असून त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होण्याची गरज आहे.

या प्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, पुणे येथील कृषी परिषदेचे विस्तार संचालक डॉ. धीरज कदम उपस्थित होते.

केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी बायोमिक्सच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात झालेल्या वाढीची सविस्तर माहिती मान्यवरांना दिली. डॉ. अंबाडकर यांनी सांगितले की, बायोमिक्सच्या वापरामुळे हळद, अद्रक, फळपिके व भाजीपाला या पिकांमध्ये विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले आहे. जमिनीतील जैवसक्रियता वाढवून मित्र बुरशी व जीवाणूंच्या संख्येत झालेली भर या यशामागे कारणीभूत आहे. त्यामुळे पिकांची वाढ, उत्पादन व गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली आहे.

ही भेट शेतीसाठी जैविक उपायांचा प्रसार व शाश्वत उत्पादनासाठीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली असून, बायोमिक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल मानले जात आहे. बायोमिक्स संशोधन केंद्राचे कर्मचारी श्री. सोमीनाथ फाळके यांचीही उपस्थिती यावेळी होती.


Thursday, May 29, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन विकास समितीच्या बैठकीची सुरुवात

 राज्‍याचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्‍त विद्यमाने राज्यातील चारही कृषि विद्यापीठाची ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती-२०२५ चे आयोजन २९ ते ३१ मे, २०२५ दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे करण्‍यात आले आहे. या बैठकीचे तसेच केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना.श्री. शिवराजसिंह चौहान यांचे दूरदृष्टी नेतृत्वात दि. २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात “विकसित कृषि संकल्प अभियानराबविण्यात येत आहे, त्याचे  उद्घाटन दिनांक २९ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. अॅड. माणिकरावजी कोकाटे होते तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे स्वागताध्यक्ष होते.

कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, कृषि, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री  मा.ना. अॅड. आशिष जयस्वाल यांची सन्मानीय प्रमुख उपस्थिती होती. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय ना. श्री हसन मुश्रीफ हे ऑनलाईन सहभागी होते .

यावेळी लोकसभा सदस्य मा. खा.  श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य मा. आ. श्री राजेश विटेकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य मा. श्री. प्रविण देशमुख, मा.डॉ. आदिती सारडा, मा. श्री. भागवत देवसरकर, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र रस्तोगी (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे), कृषि आयुक्त मा. श्री. सुरज मांढरे (भाप्रसे), पोकराचे प्रकल्प संचालक श्री. परिमल सिंह, पिडीकेव्ही अकोला आणि एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू मा. डॉ शरद गडाख, बीएसकेकेव्ही दापोलीचे  कुलगुरू मा. डॉ, संजय भावे,  परभणीचे जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे (भाप्रसे), पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी (भापोसे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर, मनपा आयुक्त श्री धैर्यशील जाधव, पुणे येथील अटारीचे श्री तुषार अत्रे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ अजय चंदनवाले, कृषि परिषदेचे सदस्य श्री विवेक दामले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

उद्घाटन समारंभात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या "विकसित भारत" या दूरदृष्टीय संकल्पनेला पूरक ठरणारे "विकसित कृषी संकल्प अभियान" आज राज्यात मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी याला कृषी क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

या अभियानाद्वारे कृषी शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणार असून, शास्त्रज्ञ आणि विस्तार यंत्रणा थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करतील. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानामुळे कृषी क्षेत्रातील सर्व संबंधित यंत्रणा एकत्र येऊन समन्वयाने काम करतील आणि महाराष्ट्र यात आघाडीवर राहील, असे त्यांनी सांगितले.

शेतीतील सध्याच्या आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जमीनधारणा कमी होत चालल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे उत्पादनखर्च आणि गुंतवणुकीवर मर्यादा येत आहेत. यासोबतच वातावरणातील बदलांमुळे पर्जन्यमानात अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे पिकांवर ताण येतो, किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी किड व रोग प्रतिकारक तसेच ताण सहन करणारे आणि हवामान अनुकूल वाण सातत्याने विकसित केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. संरक्षित, संवर्धित याबरोबरच शाश्वत शेतीसाठी तांत्रिक उपायांचा अवलंब करणे अत्यावश्यक असून, रुंद सरी वरंबा पद्धत, मूलस्थानी जलसंधारण तंत्रे आणि आधुनिक अवजारांचा प्रसार आवश्यक आहे. शासन श्रमबचतीचे उपाय आणि यंत्रबळ उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रगतशील शेतकऱ्यांचे स्थान महत्त्वाचे असल्याचे सांगताना, कापूस उत्पादक श्री. दादा लाड यांच्या तंत्रज्ञानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी विद्यापीठाने किमान दहा शेतकऱ्यांना ‘कृषी शास्त्रज्ञ’ या मानद पदवीने सन्मानित करावे, असे सूचक आवाहनही त्यांनी केले.

याशिवाय, "ॲग्रीस्टॅक" द्वारे शेतकऱ्यांची माहिती संकलित करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने त्यांना वैयक्तिक तंत्रज्ञान सल्ला देता येणार आहे. विद्यापीठांनी AI आधारित शेती तंत्रज्ञान मॉडेल विकसित करावीत, यासाठी शासन पुरेसा निधी उपलब्ध करून देत आहे. ड्रोन वापरास प्रोत्साहन तसेच अवजार बँक निर्मितीस चालना दिली जात आहे.

महाराष्ट्र शासनाने नुकतेच विकसित केलेले महाविस्तार एआय’ हे ॲप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र ठरणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना संदर्भासहित व्हिडीओ आणि लिखित माहिती देतो, तसेच मराठीमध्ये चॅटबॉटची मदत मिळत आहे,  त्याचा व्यापक वापर व्हावा यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

पोकरा टप्पा २ अंतर्गत रु. ४००० कोटींची तरतूद करून साडेसात हजार गावांचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. केंद्र शासनाकडून देखील कृषी क्षेत्रात भरीव गुंतवणूक जाहीर झाली आहे. शेवटी त्यांनी आशा व्यक्त केली की, या बैठकीतूननवे संशोधन आणि नवकल्पना पुढे येतील आणि शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न यामध्ये निश्चितच वाढ होईल.

राज्याचे कृषी मंत्री कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. अॅड. माणिकराव कोकाटे यांनी कृषी क्षेत्रातील विविध आव्हानांवर भाष्य करताना सांगितले की, शेतीसमोरील समस्यांवर मात करण्यासाठी कृषी विभाग विविध उपक्रम राबवत आहे. या सर्व उपक्रमांमध्ये मुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशीलतेने सहभागी होत असून, शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी उपाय सुचवत आहेत.

मा. ना. अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून राज्यात चार कृषी विद्यापीठांची स्थापना झाली आणि ही विद्यापीठे शेतकऱ्यांसाठी नवे तंत्रज्ञान व सुधारित वाण उपलब्ध करून देणारी महत्त्वाची दालने ठरली आहेत. विद्यापीठांद्वारे मोठ्या प्रमाणावर संशोधन घडून आले असून, अनेक प्रगतशील शेतकरी देखील विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन प्रयोग करून पुढे येत आहेत. अशा शेतकऱ्यांचे कौतुकही त्यांनी केले. केंद्रीय कृषी मंत्री ना. मा. श्री. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अधिकारी सध्या महाराष्ट्रात विशेष कार्यक्रम राबवत असून, याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यामुळे अशा भागांसाठी शाश्वत उत्पादन देणारे व कोरडवाहू परिस्थितीला तोंड देणारे वाण विकसित करणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठ या दिशेने काम करत असून शासन त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘परभणी शक्ती’ या देशातील पहिल्या जैव संपृक्त ज्वारी वाणाचे तसेच बाजारासाठी विकसित केलेल्या दोन नव्या वाणांचे त्यांनी कौतुक केले. उत्पादन वाढीसोबतच उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्यावा लागेल. सेंद्रिय शेतीस चालना देऊन विषमुक्त व आरोग्यदायी अन्नधान्य निर्माण करणे काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शास्त्रज्ञांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाहिजे, त्यांच्या तंत्रज्ञानाला चालना देऊन सुधारित उपाय प्रस्थापित करावेत. हवामान अनुकूल तंत्रज्ञान विकसित करणे व प्रसार करणे आवश्यक आहे. राज्य सरकार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करत असून, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यास कटिबद्ध आहे. महाराष्ट्र देशात शेती विकासात अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्याचे कृषि राज्यमंत्री ना. मा. अॅड. आशिष जयस्वाल म्हणाले की, कृषी क्षेत्रात योग्य दिशा आणि पद्धती अवलंबल्यास अपेक्षित वेगाने प्रगती शक्य आहे. शेतीतील विद्यमान आव्हाने पेलण्यासाठी या बैठकीतील तांत्रिक शिफारसी अत्यंत उपयुक्त ठरतील. विकसित कृषी संकल्प अभियान या राष्ट्रव्यापी अभियानामुळे आतापर्यंतचे आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे शेतीतील उत्पादनक्षमता वाढवण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी शेतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर अपरिहार्य असल्याचे सांगितले. “AI चा समावेश केल्यास निर्णयप्रक्रिया अधिक अचूक व वेगवान होईल. त्यामुळे उत्पादकता वाढवणे आणि शाश्वत शेतीसाठी नवे मार्ग खुलणे शक्य होईल,” असे ते म्हणाले. या बैठकीत मुख्यमंत्री ना. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्रात राज्याने मोठी प्रगती साधेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र रस्तोगी (भाप्रसे) यांनी स्पष्ट केले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी संशोधनाला विशेष महत्त्व आहे. याच संदर्भात माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कृषी संशोधनासंदर्भातील संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे. त्यांनी सांगितले की, केवळ विद्यापीठांकडून होणारे संशोधन नव्हे तर प्रगतशील शेतकऱ्यांनी विकसित केलेली तंत्रज्ञानदेखील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. बायोटिक आणि अबायोटिक ताण सहन करणाऱ्या नवीन वाणांच्या विकासासाठी दापोली कृषी विद्यापीठात विशेष प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. तसेच, पिकांवरील नुकसानीचे अचूक मूल्यांकन ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने करून उपाययोजना आणि नुकसानभरपाईचे निर्धारण करण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला प्रकल्प देण्यात आला आहे. त्यांनी असेही नमूद केले की, विद्यापीठांना दिल्या जाणाऱ्या निधीचा योग्य उपयोग होऊन त्यातून ठोस निष्पत्ती मिळणे आवश्यक आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स  यांचा प्रभावी वापर वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कृषी विकासाच्या दिशेने खाजगी क्षेत्र व खाजगी विद्यापीठांचीही साथ आवश्यक असून, एकत्रित प्रयत्नांनीच शाश्वत कृषी विकास साधता येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रास्तावनेत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे मन:पूर्वक स्वागत करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, या बैठकीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले नवे वाण, अवजारे आणि तंत्रज्ञान शिफारशी मंजूर करून शेतकऱ्यांच्या सेवेत आणले जाणार आहेत. देशभरात एकमेव अशी संयुक्त निर्णय प्रणाली महाराष्ट्रात राबवली जात असल्याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला. यावेळी त्यांनी कृषी संकल्प अभियानाची माहिती दिली. याबरोबरच स्पष्ट केले की, १९५०-५१ च्या तुलनेत आज अन्नधान्य उत्पादनात सहापटीने वाढ झाली आहे. हरित क्रांतीपासून सुरू झालेला शेती विकास आता ‘इंद्रधनुष्य क्रांती’च्या रूपात विविध क्षेत्रांत विस्तारलेला आहे. महाराष्ट्राने यामध्ये आघाडी घेतली असून, राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आपल्या-आपल्या विभागांतील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून, संशोधन आणि नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शेतीला दिशा देत आहेत, असे माननीय कुलगुरूंनी नमूद केले. शेवटी, विद्यापीठांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या संसाधनांची आणि सुविधांची मागणी त्यांनी यावेळी मांडली.

कार्यक्रमादरम्यान बैठकीच्या स्मरणिकेचे आणि शास्त्रज्ञांनी दिलेल्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले तसेच कापसाच्या एनएच १९०१ बीटी, एन एच १९०२ बीटी व एनएच १९०४ बीटी या तीन वाणाचे लोकार्पण केले. तसेच परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सेलू येथील १३२ के. व्ही. उपकेंद्राचे ई उद्घाटन मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान परभणी येथील डॉ. मदन पेंडके, राहुरी येथील डॉ. सुनील कदम, दापोली येथील डॉ. विजय दळवी आणि अकोला येथील डॉ. संतोष गहूकर या शास्त्रज्ञांना विद्यापीठ आणि शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट कार्य  केल्याबद्दल “उत्कृष्ट शास्त्रज्ञ २०२५” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आभार संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी मानले. कार्यक्रमात चारही कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक, शिक्षण संचालक, विस्तार शिक्षण संचालक, वनामकृविचे कुलसचिव, नियंत्रक, विद्यापीठ अभियंता, सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख यांच्यासह तीनशेहून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित होते. यावेळी विद्यापीठ तंत्रज्ञान व उपक्रमावर आधारित प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विना भालेराव आणि डॉ दयानंद मोरे यांनी केले.












राष्‍ट्रव्‍यापी विकसित कृषि संकल्प अभियानाचे माननीय मुख्‍यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते उदघाटन

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाची वनामकृवितून शुभारंभ


माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषि पद्धती, समृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषि क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरिता केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना.श्री. शिवराजसिंह चौहान यांचे दूरदृष्टी नेतृत्वात दि. २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात “विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. राष्‍ट्रव्‍यापी या अभियानाचा शुभारंभ दिनांक २९ मे २०२५ रोजी झाला.  

महाराष्ट्रात या अभियानाचा शुभारंभ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाच्या चित्ररथ वाहनाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी कृषि मंत्री मा. ना. श्री माणिकराव कोकाटे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, कृषि, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री  मा.ना. अॅड. श्री. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अभियान यशस्वी होवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्तानी लाभत असून त्यांना शास्वत उत्पादन घेता येईल असे नमूद करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी लोकसभा सदस्य मा. खा.  श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य मा. आ. श्री राजेश विटेकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य मा. श्री. प्रविण देशमुख, मा.डॉ. आदिती सारडा, मा. श्री. भागवत देवसरकर, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र रस्तोगी (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे), कृषि आयुक्त मा. श्री. सुरज मांढरे (भाप्रसे), पोकराचे प्रकल्प संचालक श्री. परिमल सिंह, वनामकृविचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि,  पिडीकेव्ही अकोला आणि एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू मा. डॉ शरद गडाख, बीएसकेकेव्ही दापोलीचे  कुलगुरू मा. डॉ, संजय भावे,  परभणीचे जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे (भाप्रसे), पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी (भापोसे), जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर, मनपा आयुक्त श्री धैर्यशील जाधव, पुणे येथील अटारीचे श्री तुषार अत्रे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ अजय चंदनवाले, प्रगतशील शेतकरी श्री. दादा लाड, कृषि परिषदेचे सदस्य श्री. विवेक दामले, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण, प्रगतशील शेतकरी श्री दादा लाड कृषि विज्ञान केंद्राचे डॉ प्रशांत भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सदरील अभियान राबविण्यासाठी  शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी कृषि क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील ७२३ जिल्ह्यांमधील ६५,००० पेक्षा जास्त गावांना भेट देणाऱ्या २,१७० तज्ज्ञ पथके सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषि विद्यापीठांचे वैज्ञानिक, संशोधन संस्थांचे तज्ज्ञ, शासकीय विभागांचे अधिकारी, नाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे (FPO) कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील १.३ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात हे अभियान कृषि विभाग आणि ५० कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून ४५०० गावांत राबवले जाणार आहे. मराठवाडा विभागासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील १२ कृषि विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले असून यासाठी शास्त्रज्ञांचे चमू तयार केले आहेत. याद्वारे प्रत्येक गावात २०० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून जवळपास २०१६०० शेतकऱ्यांना खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहचविण्यात येणार असून त्यांच्याद्वारा संपूर्ण परिसरात ते तंत्रज्ञान पोहचले जाईल.



Tuesday, May 27, 2025

कृषि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरसाठी मोठ्या संधी – सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके

 

कृषि क्षेत्रात दिवसेंदिवस मोठे बदल होत असून शेतकऱ्यांपुढे उभ्या राहणाऱ्या समस्यांचे समाधान करण्यासाठी कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक झाले आहे. कृषि अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नवनवीन तंत्रज्ञान तसेच आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे मत सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी व्यक्त केले. कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागप्रमुख डॉ. मदन पेंडके, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. रघुनाथ जायेभाये, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. पंडीत मुंडे, डॉ. सुमंत जाधव आणि जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे उपस्थित होते.

प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी केले. याप्रसंगी डॉ. मदन पेंडके, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. रघुनाथ जायेभाये, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. पंडीत मुंडे, डॉ. सुमंत जाधव व डॉ. प्रमोदीनी मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिद्द, परिश्रम, चिकाटी आणि सातत्य यांच्या जोरावर निश्चितच यश संपादन करता येते.

या कार्यक्रमात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकी सौरभ काळे, राऊत, बौरकर, आदित्यराज, प्रथमेश क्षीरसागर, जान्हवी चव्हाण, खुशबू कुमारी, गायत्री वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. मधुकर मोरे, डॉ. संदीपान पायाळ, डॉ. रवींद्र शिंदे, प्रा. लक्ष्मीकांत राहुतमारे, डॉ. ओंकार गुप्ता, डॉ. गजानन वसु, डॉ. आश्विनी गावंडे, डॉ. शैलेजा देशविना, श्री. शंकर शिवणकर, हर्षल मनोहर, रिया देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामेश्वर खटिंग व कु. आबा सिंग यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. दत्तात्रेय पाटील यांनी मानले.