Monday, May 26, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन विकास समितीच्या बैठकीचे आयोजन

 राज्‍याचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

तीन दिवशीय बैठकीत तीनशे ते चारशे कृषि शास्‍त्रज्ञांचा सहभाग, ३६ नवीन वाणासह साधारणतः २४७ तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या ५३ व्‍या बैठकीनिमित्‍त दिनांक २६ मे रोजी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्‍न झाली. या पत्रकार परिषदेत संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश आहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, प्रभारी नियंत्रक श्री. सुधाकर सोळंके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागरडॉ. राहुल रामटेके, डॉ विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रसिद्धी समितीचे सर्व सदस्य आणि बियाणे विभागाचे अधिकारी तसेच विविध प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ शंकर पुरी यांनी केले तर आभार विभाग प्रमुख डॉ राजेश कदम यांनी मानले.


प्रेस नोट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्‍त विद्यमाने राज्यातील चारही कृषि विद्यापीठाची ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन विकास समिती-२०२५ चे आयोजन २९ ते ३१ मे, २०२५ दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे करण्‍यात आले आहे. या बैठकीचे उद्घाटन २९ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री  मा. ना. श्री. अजित पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. अॅड. माणिकरावजी कोकाटे राहणार असून कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे स्वागताध्यक्ष आहेत.

कार्यक्रमास पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, कृषि, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री  मा.ना. अॅड. आशिष जयस्वाल, कृषि परीषदेचे उपाध्यक्ष मा. ना. मा. श्री तुषार पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे.  

यावेळी राज्यसभा सदस्य मा. खा. श्रीमती फौजिया खान, लोकसभा सदस्य मा. खा.  श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. विक्रम काळेविधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. रमेशराव कराड, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. अभिमन्यू पवार आणि विधानसभा सदस्य मा. आ. श्री राजेश विटेकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य मा. श्री विठ्ठल सकपाळ, मा. श्री. सुरज जगताप, मा. श्री. प्रविण देशमुख, मा. श्री. दिलीप देशमुख, मा.डॉ. आदिती सारडा, मा. श्री. भागवत देवसरकर, मा. डॉ. कौशिक बॅनर्जी, मा. डॉ. व्ही. एम. मायंदे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र रस्तोगी (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे), कृषि आयुक्त मा. श्री. सुरज मांढरे (भाप्रसे), पिडीकेव्ही अकोला आणि एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू मा. डॉ शरद गडाख, बीएसकेकेव्ही दापोलीचे  कुलगुरू मा. डॉ, संजय भावे हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत.

कृषि परिषदेचे सर्व संचालक, चारही कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक, शिक्षण संचालक, विस्तार शिक्षण संचालक यांच्यासह जवळपास तीनशे ते चारशे शास्त्रज्ञ उपस्थित रहाणार आहेत. यावेळी विद्यापीठ तंत्रज्ञान व उपक्रमावर आधारित प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे.

महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकरी बांधवापर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या बैठकीचे आयोजन दरवर्षी एका कृषी विद्यापीठात करण्‍यात येते. यावर्षी परभणी कृषी विद्यापीठास बैठक आयोजित करण्‍याचा  मान  प्राप्‍त झाला.

हवामान बदल, दुष्काळ, जमिनीच्या सुपीकतेचा ऱ्हास, व वाढती लोकसंख्या अशा अनेक आव्हानांमुळे राज्यातील कृषी उत्पादनावर मर्यादा येत असताना राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वतता निर्माण करण्यासाठी विविध पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणाऱ्या ३६ नवीन वाणांसह साधारणतः २४७ तांत्रिक शिफारसी या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. या शिफारसींमध्ये सुधारित व संकरीत वाण, पशुधनाच्या सुधारीत प्रजाती, आधुनिक पीक लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड-रोग व्यवस्थापन, तसेच मृद व जलसंधारणासंबंधी उपाययोजना यांचा समावेश आहे.

ही बैठक केवळ शिफारसी मांडण्यासाठीच नव्हे, तर कृषी क्षेत्रातल्या वास्तव परिस्थितीचा अभ्यास करून शाश्वत व दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्यात येतात.

सदर बैठक ही तीन दिवसांकरिता आयोजित करण्यात येत असुन पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येतो. त्यानंतर तीन तांत्रिक सत्रांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये पहिल्या तांत्रिक सत्रात कृषि संलग्न विभागाच्या संचालकांमार्फत आणि राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या वतीने सादरीकरण केले जाते.

दुस­या दिवशी आयोजित केलेल्या दुस­या तांत्रिक सत्रात १२ गट तयार करुन विद्यापीठामार्फत संशोधीत केलेले विविध पिकांचे संकरित व सुधारित वाण, यंत्र व अवजारे आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या जातात. यावर सखोल चर्चा होवुन अशा शिफारशींना समितीमार्फत मान्यता दिली जाते.

तिस­या दिवशीच्या समारोपीय तांत्रिक सत्रात दोन दिवसात झालेले सर्व सादरीकरण आणि निर्णय तसेच समितीने दिलेल्या सर्वसाधारण सुचना या संदर्भात सादरीकरण केले जाते आणि सर्व कार्यवृतांतास मान्यता दिली जाते आणि या बैठकीचा समारोप करण्यात येतो.

 चारही विद्यापीठांचे विविध पिकांचे संकरित व सुधारित वाण, यंत्र व अवजारे आणि तंत्रज्ञान शिफारशी मान्यतेनंतर महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागास सादर करुन विस्तार यंत्रणेमार्फत शेतक­यांच्या शेतावर प्रत्यक्ष राबविण्यात येतात.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ५८ शिफारशींचे सादरीकरण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांमार्फत संशोधनावर आधारीत एकुण ५८ शिफारशी बैठकीत सादर करण्यात येणार असुन यात चार (४) प्रसारीत वाणएक (१) कृषि औजारे यासह इतर ५३ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्‍या १०३ शिफारशींचे सादरीकरण

डॉ. पंजाबराव देश्‍मुख कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण १०३ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात १० प्रसारित वाण१२ कृषि अवजारांसह इतर ८१ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.

राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्‍या ९४ शिफारशींचे सादरीकरण

महात्मा फुले कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण ९४ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात ९ प्रसारित वाण११ पूर्वप्रसारीत वाण, ३ कृषि अवजारे, १ जैविक ताण सहन करणारे स्त्रोतसह इतर ७० तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्‍या  ५० शिफारशींचे सादरीकरण

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण ५० शिफारशी सादर करण्यात येणार असून यात २ प्रसारित वाण५ कृषि अवजारांसह ४३ सुधारीत तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.

तांत्रिक चर्चासत्रात साधारणत: ३०० हून अधिक शास्‍त्रज्ञांचा सहभाग

तीन दिवस चालणा­या या बैठकीच्या तां‍त्रिक चर्चासत्रात चारही कृषि विद्यापीठातील साधारणत: ३०० हून अधिक कृषि शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार असुन वरील सर्व शिफारशींवर विचारमंथन होऊन शेतकऱ्यासाठी प्रसारीत करण्यासाठी त्यास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. प्रथम सत्रामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील नऊ संशोधन संस्थांचे संचालक तसेच शास्त्रज्ञराज्यशासनाच्या विविध विभागाचे आयुक्त पदाचे अधिकारीकृषि विषयक खात्‍याचे प्रमुखांचे व राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक अहवालाचे सादरीकरण करणारआहेत.

राष्‍ट्रीय पातळीवरील शास्‍त्रज्ञांचे विशेष सादरीकरण

अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे संचालक श्री योगेश कुंभेजकर, नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. व्ही एन वाघमारे, राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. दिलीप घोष तर मुंबई येथील केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. के. शुक्ला यांचे सादरीकरण होणार आहे. मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. एन पी साहू तसेच बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डीसोलापुर येथील राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर ए मराठेपुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जीनागपुर येथील राष्ट्रीय मृद सर्वेक्षण व जमीन वापर योजना केंद्राचे संचालक डॉ. एन. जी. पाटीलपुणे येथील कांदा व लसुण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. विजय महाजन आणि फुलशेती संशोधन संचालनालयकृषि महाविद्यालय पुणे येथील संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांचे त्यांच्या क्षेत्रातील विविध विषयावर संशोधनात्मक सादरीकरण राहणार आहे. याप्रकारच्या वैविध्यपुर्ण संशोधनात्मक सादरीकरणातून राज्यातील कृषि संशोधनकांना मार्गदर्शक ठरणार आहेत.

तांत्रिक सत्राच्या एकुण १२ गटांमार्फत विविध शिफारशीवर विचारमंथन होणार आहे. तांत्रिक सत्राच्या पहिल्या गटात शेत पीके (पीक सुधारणा व तंत्रज्ञान सुधारात्मक व्युहरचना) यावर शिफारशी प्रसारीत होणार आहेत. नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनउद्यानविद्या आणि पशु व मत्स्य विज्ञान या वरील शिफारशी अनुक्रमे गट क्र. २३ व ४ मध्ये मांडण्यात येणार आहेत. गट क्र. ५ मध्ये मुलभुत शास्त्रेअन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयावरील शिफारशी मांडण्यात येणार आहेत तर गट क्रमांक ६७ व ८ मध्ये पीक संरक्षणकृषि अभियांत्रिकी व सामाजीक शास्त्र या विषयावरील शिफारशी मांडण्यात येणार आहेत. शेती पीके आणि उद्यानविद्या वाण प्रसारण तसेच कृषि यंत्रे व अवजारे प्रसारणावर चर्चा गट क्र. ९१० व ११ मध्ये होणार आहे. जैविक ताण सहन करणारे स्त्रोत नोंदणी प्रस्ताव गट क्र. १२ मध्ये मांडण्यात येणार आहे.

राष्‍ट्रव्‍यापी विकसित कृषि संकल्प अभियानाचे माननीय मुख्‍यमंत्री यांच्‍या हस्‍ते उदघाटन

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषी पद्धती, समृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरिता केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने दि. २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात “विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ दिनांक २९ मे २०२५ रोजी होणार आहे. या अभियानामध्ये देशातील ७२३ जिल्ह्यांमधील ६५,००० पेक्षा जास्त गावांना भेट देणाऱ्या २,१७० तज्ज्ञ पथका सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषी विद्यापीठांचे वैज्ञानिक, संशोधन संस्थांचे तज्ज्ञ, शासकीय विभागांचे अधिकारी, नाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे (FPO) कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील १.३ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात या अभियानाचे उद्घाटन परभणी कृषी विद्यापीठात माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यात हे अभियान कृषी विभाग आणि ५० कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून ४५०० गावांत राबवले जाणार आहे. मराठवाडा विभागातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या आठ जिल्ह्यांतील १२ कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून १,०८० गावांमध्‍ये राबविण्‍यात येणार आहे.

सदर बैठकीत नैसर्गिक शेतीस चालना देण्यासाठी “पीएम प्रणाम” योजनेवर विचार मंथन करण्‍यात येणार आहे तसेच हवामान अनुकूल तंत्रज्ञान, पिकांच्या बाजारभाव आणि मागणीनुसार अंदाज बाधण्‍यासाठी राज्‍यापातळीवर सर्वांच्‍या सहभागातुन विकास यंत्रणा निर्माण करण्‍यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाचा असलेला शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र : ‘महाविस्तार एआय’ ॲपचा प्रभावी वापर होण्याच्या दृष्‍टीने सदरिल बैठकित विचार मंथन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिली.

सदरील बैठकीचा समारोप ३१ मे रोजी होणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे माननीय राज्यपाल  तथा विद्यापीठाचे  माननीय कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णनजी, मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आदींसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आल्याची माहिती संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी दिली.