वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी नेत्रदान जनजागृती कार्यक्रम संपन्न
कार्नियल अंधत्व असलेल्या रुग्णांना दृष्टी परत
मिळवण्यासाठी नेत्रदान उपयुक्त ठरते. नेत्रदान हे मृत्यूनंतर केले जाणारे अत्यंत
पवित्र आणि उपयोगी दान असून, समाजामध्ये याबाबत जागरूकता
निर्माण होणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी केले.
कृषी अभियांत्रिकी व तंत्र महाविद्यालय, परभणी येथे आयोजित नेत्रदान जनजागृती कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून दिनांक
१६ मे रोजी बोलत होते. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री. विनोद डावरे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राहुल रामटेके, जिमखाना
उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना डॉ. राहुल रामटेके म्हणाले, डोळ्यांमुळेच आपण जगातील सौंदर्य अनुभवू शकतो. दृष्टी ही ज्ञानप्राप्तीचे
मुख्य साधन आहे. डोळे नसतील, तर जीवनातील अनेक गोष्टी अशक्य
होतात. त्यामुळे नेत्रदानाचे महत्त्व सर्वांनी ओळखले पाहिजे.
श्री. विनोद डावरे यांनी जागतिक आरोग्य
संघटनेच्या अहवालाचा उल्लेख करत सांगितले की, भारतामध्ये
सुमारे १८ दशलक्ष लोक अंध आहेत. भारतातील कायद्यानुसार नेत्रदान हे मरणोत्तरच केले
जाते. चष्मा वापरणारे, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली तसेच
मधुमेह किंवा मानसिक त्रास असलेली व्यक्तीही नेत्रदान करू शकते. मृत व्यक्तीच्या
डोळ्याच्या कार्नियाचा उपयोग दृष्टी पुनर्प्राप्तीसाठी केला जातो.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकूण ७५ जणांनी
मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा
योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले. सूत्रसंचालन राधेश्याम
खटींग यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रविंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रथम वर्षाचे विद्यार्थी राम शेंडगे, सतेज मेटकर, यश ढाकणे, अजय शिराळे तसेच प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. सुमंत जाधव, डॉ. मधुकर मोरे, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. प्रमोदिनी मोरे यांचे विशेष योगदान लाभले