या प्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ.
भगवान आसेवार, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष
वेणीकर, पुणे येथील कृषी परिषदेचे विस्तार संचालक डॉ. धीरज
कदम उपस्थित होते.
केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी बायोमिक्सच्या
वापरामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात झालेल्या वाढीची सविस्तर माहिती
मान्यवरांना दिली. डॉ. अंबाडकर यांनी सांगितले की, बायोमिक्सच्या वापरामुळे हळद,
अद्रक, फळपिके व भाजीपाला या पिकांमध्ये
विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले आहे. जमिनीतील जैवसक्रियता वाढवून मित्र बुरशी व
जीवाणूंच्या संख्येत झालेली भर या यशामागे कारणीभूत आहे. त्यामुळे पिकांची वाढ,
उत्पादन व गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली आहे.
ही भेट शेतीसाठी जैविक उपायांचा प्रसार व शाश्वत उत्पादनासाठीचा एक
महत्त्वपूर्ण टप्पा ठरली असून, बायोमिक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न
वाढवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल मानले जात आहे. बायोमिक्स संशोधन केंद्राचे
कर्मचारी श्री. सोमीनाथ फाळके यांचीही उपस्थिती यावेळी होती.