वनामकृविच्या विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात "कृषि शिक्षण आणि संशोधनातील सध्याचा कल आणि संधी " कार्यशाळा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथे “कृषि शिक्षण आणि संशोधनातील सध्याचा कल आणि संधी” या विषयावर विचारमंथन करिता विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष यांचे वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि मार्गदर्शक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व माजी कुलगुरू डॉ. विलास भाले तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, संचालक विस्तार डॉ. राकेश अहिरे, माजी कुलसचिव डॉ. दिगंबर चव्हाण व अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्षीय
समालोचनात म्हणाले कि, हवामान बदलाच्या परिस्थितीतही
अन्नसुरक्षेकरिता व शाश्वत कृषि विकासासाठी जैवतंत्रज्ञान आधारित कीड रोग
प्रतिबंधक, जनुकीय सुधारित ताण सहन करणारे वाण, लवकर परिपक्व होणारे व कोणत्याही तापमानास तग धरणारे पिकांचे वाण, अजैविक ताण प्रतिबंधक पिक वाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढ शक्य होईल.
जैवतंत्रज्ञानास कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाची जोड देवून कृषि
क्षेत्रात हवामान बदलाचे विपरीत परिणाम कमी करता येतील.
माननीय डॉ. शरद गडाख यांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून
जैवतंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध पर्यायाबाबत मार्गदर्शन केले.
जैवतंत्रज्ञान व्यवसायातील संधी व रोजगार, कंपन्यांना
अनुवांशिक चाचण्या (जेनेटीक टेस्टिग) आणि संबंधित सेवा पुरवणे, उद्योग क्षेत्रात जैवतंत्रज्ञान संबंधित सल्लागार म्हणून काम करणे, जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञ व पिक पैदासकार यांच्या समन्वयातून विविध
पिकांचे वाण विकसित करणे ई. विषयावर मागदर्शन केले.
माननीय डॉ. विलास भाले याबाबत म्हणाले कृषितील नवीन शैक्षणिक
धोरण कृषि विकासात उपयोगी शेतकरी व कृषि संशोधन याच्या प्राधान्याबरोबर कृषि
व्यापार व उद्योग यात लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ई. करिता राबविण्यात आले
आहे. यामध्ये आधुनिक शेतकरी निर्माण करणारा, व्यापार-उद्योगात
सहभागी होणारा व संशोधनात उपयोगी पडणारा असा त्रिसूत्री कृषि अभ्यासक्रम
राबविण्यात आलेला आहे. महाविद्यालयाच्या परिसरात असलेली विपुल वृक्ष संपदा व पक्षी
वैभव याबाबत त्यांनी विशेष कौतुक केले आहे व ते पुढे म्हणाले कि हा परिसर
लातूरच्या वैभवात भर घालत आहे.
महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी डॉ.
बाबासाहेब ठोंबरे यांनी प्रास्तविकात नमूद केले की, विद्यार्थी, शेतकरी व कष्टकरी यांना केंद्र बिंदू मानून कृषि क्षेत्रात कार्य करणे
गरजेचे आहे. जैवतंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, सेन्सर, आयओटी, मोबाईल ॲप्स ई. आधुनिक तंत्रज्ञांचा वापर शाश्वत कृषि
विकासासाठी महत्वाचा आहे.
या कार्यशाळेस सहयोगी अधिष्ठाता गजेंद्र लोंढे, कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे
वनस्पतीशास्र विभागप्रमुख हिराकांत काळपांडे, डॉ. व्यंकट
जगताप , डॉ. विजय भामरे,, डॉ. मोहन
धुप्पे, डॉ. वसंत सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती.
सूत्रसंचालन कु. वैष्णवी धांडगे हिने केले व आभार ऋषिकेश मताळे
ह्याने मानले. कार्यशाळेचे यशस्वीतेसाठी डॉ. अच्युत भरोसे, डॉ. महेंद्र दुधारे, डॉ.राहुल चव्हाण, डॉ. योगेश भगत, डॉ. दिप्ती वानखडे, वीरभद्र दुरुगकर, अभिजित देशमुख, गोवेसुद्दिन अन्सारी व किशोर घोळवे यांनी विशेष परिश्रम घेतले. केले.
कार्यशाळेत कृषि महाविद्यालय, कृषि जैवतंत्रज्ञान
महाविद्यालय, गळीतधान्य संशोधन केंद्र येथील प्राध्यापक,
अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थिनी-विद्यार्थी
मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.