Tuesday, May 27, 2025

कृषि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरसाठी मोठ्या संधी – सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके

 

कृषि क्षेत्रात दिवसेंदिवस मोठे बदल होत असून शेतकऱ्यांपुढे उभ्या राहणाऱ्या समस्यांचे समाधान करण्यासाठी कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक झाले आहे. कृषि अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नवनवीन तंत्रज्ञान तसेच आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे मत सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी व्यक्त केले. कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागप्रमुख डॉ. मदन पेंडके, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. रघुनाथ जायेभाये, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. पंडीत मुंडे, डॉ. सुमंत जाधव आणि जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे उपस्थित होते.

प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी केले. याप्रसंगी डॉ. मदन पेंडके, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. रघुनाथ जायेभाये, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. पंडीत मुंडे, डॉ. सुमंत जाधव व डॉ. प्रमोदीनी मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिद्द, परिश्रम, चिकाटी आणि सातत्य यांच्या जोरावर निश्चितच यश संपादन करता येते.

या कार्यक्रमात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकी सौरभ काळे, राऊत, बौरकर, आदित्यराज, प्रथमेश क्षीरसागर, जान्हवी चव्हाण, खुशबू कुमारी, गायत्री वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. मधुकर मोरे, डॉ. संदीपान पायाळ, डॉ. रवींद्र शिंदे, प्रा. लक्ष्मीकांत राहुतमारे, डॉ. ओंकार गुप्ता, डॉ. गजानन वसु, डॉ. आश्विनी गावंडे, डॉ. शैलेजा देशविना, श्री. शंकर शिवणकर, हर्षल मनोहर, रिया देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामेश्वर खटिंग व कु. आबा सिंग यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. दत्तात्रेय पाटील यांनी मानले.