वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाची वनामकृवितून शुभारंभ
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषि पद्धती, समृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषि क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरिता केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना.श्री. शिवराजसिंह चौहान यांचे दूरदृष्टी नेतृत्वात दि. २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात “विकसित कृषि संकल्प अभियान” राबविण्यात येणार आहे. राष्ट्रव्यापी या अभियानाचा शुभारंभ दिनांक २९ मे २०२५ रोजी झाला.
महाराष्ट्रात या अभियानाचा शुभारंभ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठात माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते अभियानाच्या चित्ररथ वाहनाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी कृषि
मंत्री मा. ना. श्री माणिकराव कोकाटे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी
पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व
बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर,
कृषि, वित्त, नियोजन,
मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा.ना. अॅड.
श्री. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
माननीय मुख्यमंत्री ना.
श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अभियान यशस्वी होवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप
पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान
आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्तानी लाभत असून त्यांना शास्वत उत्पादन घेता येईल
असे नमूद करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी लोकसभा सदस्य मा. खा.
श्री. संजय जाधव,
विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश
चव्हाण, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ.
राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री रत्नाकर गुट्टे, विधानसभा
सदस्य मा. आ. श्री राजेश विटेकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद
सन्मानीय सदस्य मा. श्री. प्रविण देशमुख, मा.डॉ. आदिती सारडा,
मा. श्री. भागवत देवसरकर, महाराष्ट्र राज्याचे
प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र रस्तोगी (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे),
कृषि आयुक्त मा. श्री. सुरज मांढरे (भाप्रसे),
पोकराचे प्रकल्प संचालक श्री. परिमल सिंह, वनामकृविचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि, पिडीकेव्ही अकोला आणि
एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू मा. डॉ शरद गडाख, बीएसकेकेव्ही दापोलीचे कुलगुरू मा. डॉ, संजय
भावे, परभणीचे जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे
(भाप्रसे), पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी (भापोसे), जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर, मनपा आयुक्त
श्री धैर्यशील जाधव, पुणे येथील अटारीचे श्री तुषार अत्रे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन
संचालक डॉ अजय चंदनवाले, प्रगतशील शेतकरी श्री. दादा लाड, कृषि परिषदेचे सदस्य श्री.
विवेक दामले, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.
दौलत चव्हाण, प्रगतशील शेतकरी श्री दादा लाड कृषि विज्ञान केंद्राचे
डॉ प्रशांत भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सदरील अभियान
राबविण्यासाठी शेतकऱ्यांचे कल्याण
साधण्यासाठी कृषि क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषि
अनुसंधान परिषद परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील ७२३
जिल्ह्यांमधील ६५,००० पेक्षा जास्त गावांना भेट देणाऱ्या २,१७० तज्ज्ञ पथके
सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील.
या पथकांमध्ये कृषि विद्यापीठांचे वैज्ञानिक, संशोधन संस्थांचे तज्ज्ञ, शासकीय विभागांचे
अधिकारी, नाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे (FPO)
कर्मचारी
यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील १.३ कोटींपेक्षा
अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले
आहे.
महाराष्ट्र राज्यात हे अभियान कृषि विभाग आणि ५० कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून ४५०० गावांत राबवले जाणार आहे. मराठवाडा विभागासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील १२ कृषि विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले असून यासाठी शास्त्रज्ञांचे चमू तयार केले आहेत. याद्वारे प्रत्येक गावात २०० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून जवळपास २०१६०० शेतकऱ्यांना खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहचविण्यात येणार असून त्यांच्याद्वारा संपूर्ण परिसरात ते तंत्रज्ञान पोहचले जाईल.