माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर (जिल्हा जालना) येथील कृषि संशोधन केंद्रास अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – खरिप कडधान्ये (AICRP on Kharif Pulses) अंतर्गत “सर्वोत्तम केंद्र पुरस्कार” (Best Centre Award) मिळाल्याचा मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. ही घोषणा ७ ते ९ मे दरम्यान जयपूर येथे झालेल्या वार्षिक गट बैठकीत करण्यात आली. देशपातळीवर खरिप कडधान्ये यावर एकूण ३५ केंद्रे कार्यरत असून राष्ट्रीय पातळीवर हा भव्य सन्मान समजला जातो.
हा पुरस्कार दिनांक ७ मे रोजी भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सन्माननीय
महासंचालक डॉ. मांगी लाल जाट यांच्या शुभहस्ते
प्रदान करण्यात आला. यावेळी पिक विज्ञानचे सह महासंचालक डॉ. डी. के. यादव, कडधान्येचे सहायक महासंचालक
डॉ. संजीव गुप्ता, कडधान्येचे संचालक डॉ. जी. पी. दीक्षित,
तसेच अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - खरिप कडधान्येचे प्रकल्प
समन्वयक डॉ. आदित्य प्रताप आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली विद्यापीठ नवीन संशोधन व शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञान
विस्तार या दिशेने वेगाने प्रगती करत असून, मराठवाडा विभागात शेतीविकासासाठी
सातत्याने कार्यरत आहे.
या गौरवामागे केंद्राने खरिप हंगामातील तूर, मुग, उडीद, हरभरा यासारख्या कडधान्य पिकांवर केलेले उत्कृष्ट
संशोधन, नवीन वाणांचा विकास, प्री-ब्रीडिंग
संशोधन, आणि शाश्वत शेतीसाठी उपयुक्त उत्पादन व संरक्षण
तंत्रज्ञान हे घटक महत्वाचे ठरले आहेत.
या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी तसेच संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण
संचालक डॉ. राकेश अहिरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख आणि
कर्मचाऱ्यांनी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
या यशाचे श्रेय
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाला, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या कुशल मार्गदर्शनाला, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, तसेच विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता,
विभागप्रमुख आणि संपूर्ण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिवाराच्या
सहकार्याला कृषि संशोधन केंद्रास अखिल
भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – खरिप कडधान्य बदनापुरचे शास्त्रज्ञ डॉ दीपक पाटील,
डॉ. किरण जाधव, डॉ. विष्णू गित्ते आणि सर्व चमुनी दिले. याशिवाय, केंद्राच्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या आणि भरघोस उत्पादन घेणाऱ्या
शेतकरी बांधवांचेही विशेष आभार मानून त्यांच्या पाठबळामुळेच हे यश शक्य झाले आहे
असे नमूद केले. हे यश केवळ विद्यापीठाचेच नव्हे, तर मराठवाड्याच्या
प्रगत शेतीचे प्रतीक ठरले आहे.