Wednesday, March 30, 2022

राज्यस्तरीय तीस दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्या सुवर्ण जयंती महोत्सवाचे औचित्य साधुन सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने शेतकरी बंधु भगिनी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि शास्त्रज्ञ, विद्यार्थी, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांचे साठी  राज्यस्तरीय तीस दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातुन दिनांक 15 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले होते.

सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ दिनांक 31 मार्च गुरवार रोजी सायंकाळी 7.00 वा ऑनलाईन पद्धतीने झुम मिटींगव्दारे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण असून प्रमुख पाहुणे म्‍हणुन नवसारी कृषि विद्यापीठाचे (गुजरात) चे कुलगुरु मा. डॉ. झिनाभाई पटेल, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा  डॉ. राजाराम देशमुख आणि डेहराडुन येथील भा.कृ.अ.प.-भारतीय मृद व जल संधारण संस्थेचे संचालक डॉ. एम. मधु  हे उपस्थित राहणार आहेत. तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे प्रकल्‍प संचालक श्री संतोष आळसे, नवसारी येथील एनएम कृषि महाविद्यालयाचे मृदविज्ञान शास्‍त्रज्ञ डॉ. सोनल त्रिपाठी, प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. सोपानराव अवचार आदींची उपस्थिती लाभणार आहे.

ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्‍यासाठी 7810015203 या झुम आयडी क्रमांक  आणि 12345 पासवर्ड चा वापर करावा, तरी समारोप ऑनलाईक कार्यक्रमात सहभागी होण्‍याचे आवाहन प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे आणि सर्व सदस्य शास्त्रज्ञ यांनी केले आहे.

सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मा. कुलगुरू डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्‍यान करण्‍यात आले, दररोज सायंकाळी 7.00 ते 8.30 या शेतक­यांच्या सोयीच्या वेळेत व्याख्याने झुम मिटिंगच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आले होते.  तसेच कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठ युटयुब चॅनल www.youtube.com/user/vnmkv  वर प्रसारीत करण्यात आले होते. प्रशिक्षणात सेंद्रीय शेतीमध्ये पीक लागवड तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन, जैविक कीड व रोग व्यवस्थापन, भाजीपाला व फळपिकांचे सेंद्रीय पद्धतीने व्यवस्थापन, सेंद्रीय शेतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, रेशीम उद्योग, प्रक्रिया उद्योग, अवजारांचा कार्यक्षम वापर, सौर ऊर्जा व इतर अपारंपारिक साधनांचा वापर, जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर, पशुधन व्यवस्थापन, मधुमक्षीका पालन, सेंद्रीय प्रमाणीकरण, सेंद्रीय शेतमाल विक्री व बाजारपेठ तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर राज्यातील व देशातील नामांकित कृषि विद्यापीठे, संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था येथील तज्ञांनी मार्गदर्शन केले. यात नवसारी कृषि विद्यापीठ, गुजरात, आनंद कृषि विद्यापीठ, गुजरात, केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैद्राबाद, भारतीय एकात्मिक शेती पध्दती संशोधन संस्था, मोदीपुरम, उत्तर प्रदेश, राष्ट्रीय जैविक शेती केंद्र, गाजीयाबाद, प्रादेशिक जैविक शेती केंद्र, नागपूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, कृषि विभाग व इतर स्वयंसेवी व खाजगी संस्थेतील  एकूण 44 शास्त्रज्ञ / तज्ञांनी 34 सत्रांमध्ये वरील विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकूण 5533 प्रशिक्षणार्थी यांनी नोंदणी केली. याचा लाभ राज्यातील व राज्याबाहेरील शेतकरी, विद्यार्थी, अधिकारी / कर्मचारी बचत गटाच्या महिला मोठया संख्येने झुम मिटींग व युटयुबच्या माध्यमातुन लाभ घेतला. प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान प्रत्येक व्याख्यान हे 60 मिनिटांचे झाले व व्याख्यानानंतर तज्ञांची व प्रशिक्षणार्थ्‍यांची संबंधित विषयावर प्रश्‍नोत्‍तरे व चर्चा झाली. व्याख्यात्यांनी शेतक­यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. सलग 30 दिवस आणि दररोज सायंकाळी शेतक­यांच्या सोयीच्या वेळेत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ही राज्यातच नाही तर देशातील कृषि विद्यापीठाच्या दृष्टीने ऐतिहासीक, अत्यंत अभिनव व अव्दितीय असा उपक्रम ठरला आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले होते. यात प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे व सर्व सदस्य शास्त्रज्ञ डॉ. स्मिता खोडके, डॉ. कैलास गाढे, डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. प्रविण कापसे, डॉ. संतोष फुलारी, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. अनुराधा लाड, डॉ. श्रध्दा धुरगुडे, डॉ. प्रीतम भुतडा, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. सारीका नारळे, श्री. ऋषीकेश औंढेकर, श्री. अभिजीत कदम, डॉ. सुनिल जावळे, श्री. दिपक शिंदे, श्री. सतिश कटारे, श्री. भागवत वाघ, श्री. दशरथ गरुड, श्री. सचिन रणेर यांनी सदर प्रशिक्षण कार्यक्रमध्ये हिरहिरीने काम केले. विद्यापीठातील विविध विभागाचे शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांनी विविध भुमीकेत तसेच प्रशिक्षणार्थी म्हणुन सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.