Thursday, October 3, 2013

महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंतीप्रित्‍यर्थ विद्यापीठात स्‍पर्धा परिक्षा मार्गदर्शन


     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री यांची जयंती उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. त्‍यानिमित्‍त कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांसाठी स्‍पर्धा परिक्षेबाबत अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक श्री प्रणय अशोक मार्गदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ.डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ. उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी प्रा. महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, श्री दिवाकर काकडे, डॉ धीरज कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री प्रणय अशोक आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, स्‍पर्धा परिक्षात यश संपादन करण्‍यासाठी कठीण परिश्रम करण्‍याची तयारी पाहिजे. ध्‍येय निश्चित करून वेळेचे नियोजन करावे, मुलभुत ज्ञान प्राप्‍त करणे आवश्‍यक आहे. अभ्‍यासात सातत्‍य पाहिजे तसेच मुलाखतीत आपला समाजाप्रती असलेला दृष्टिकोन महत्‍वाचा ठरतो. विद्यार्थ्‍यांनी गांधीजी व शास्‍त्रीजी यांच्‍या वैचारीक प्रेरणा घेउन आचरण करावे. कठीण परिस्थितीत संयमाने वागुन विजय मिळवित आला पाहिजे असे सल्‍लाही त्‍यांनी सांगितले.
      या कार्यक्रमात कार्यक्रमाधिकारी प्रा. रविंद्र शिंदे यांनी स्‍वयंसेवकांना अहिंसा, सत्‍य व शांततेविषयीची शपथ दिली. कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय जाधव यांनी विद्यार्थ्‍यांना शास्‍त्रीजींच्‍या जीवनशैलीची माहिती दिली. तसेच विदयार्थ्‍यानी महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री यांच्‍या बाबत आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रा. अनिल कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. महेश देशमुख यांनी केले.
      कार्यक्रमाच्‍या यशस्वितेकरीता राष्ट्रिय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका परीश्रम घेतले. कार्यक्रमास 500;600 विद्यार्थ्‍यी उपस्थित होते.


Wednesday, October 2, 2013

राष्ट्रिय सेवा योजनाच्‍या वतीने शांतता रॅलीचे आयोजन

शांतता रॅलीत सहभागी स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका



वृक्षारोपण करतांना कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे व जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंन्‍द्र प्रताप सिंह, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ डि बी देवसरकर, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा अनिस कांबळे, प्रा रविंद्र शिंदे, प्रा विजय जाधव आदी 
राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंती दिनानिमित्‍य वसंतराव नार्इक कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या राष्ट्रिय सेवा योजनाच्‍या वतीने शांतता रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. या शांतता रॅलीस कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे व जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंन्‍द्र प्रताप सिंह यांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखवुन सुरवात करण्‍यात आली. या प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ डि बी देवसरकर, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख उपस्थित होते. रॅलीला संबोधीत करतांना जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंन्‍द्र प्रताप सिंह म्‍हणाले की, महात्‍मा गांधी व लाल बहाद्दुर शास्‍त्री यांच्‍या जंयत्‍या नुसत्‍या साज-या करू नयेत तर त्‍यांचे विचार आचरणात आणा, कारण गांधीजीनी अहिंसा व सत्‍य ही तत्‍वे स्‍वत: आचरणात आणल्‍याने ते महान होते. सर्व विद्यार्थ्‍यानी त्‍यांचे विचार आचरणात आणावेत. लाल बहादुर शास्‍त्री व गांधीजी हे त्‍यांच्‍या साधेपणामुळे ही परीचित होते. जय जवान जय किसान नारा हा शास्‍त्रीजीनी दिला. कारण त्‍यांना शेतकरी बाधवांचे देशाच्‍या विकासासाठीचे महत्‍व माहीत होते. या प्रसंगी कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे म्‍हणाले की, गांधीजीनी खेडया कडे चला हा नारा दिला, कारण खेडे स्‍वंयपुर्ण झाले तर देश स्‍वयंपुर्ण होईल याची जाणीव त्‍यांना होती.
याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ परीसरात वृक्षारोपण करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा अनिस कांबळे, प्रा रविंद्र शिंदे, प्रा विजय जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली रासेयोचे स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी परीश्रम घेतले.

वसंतराव नाईक कृषि विद्यापीठास अखंडीत वीज पुरवठयासाठी द्रुतगती वाहीनी कार्यान्‍वीत



वसंतराव नार्इक कृषि विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍ताराचे कार्य केल्‍या जाते. मराठवाडा विभागासाठी स्‍थापन झालेल्‍या या कृषि विद्यापीठास विद्युत विषयक अनेक समस्‍यामुळे शैक्षणिक व संशोधन कार्यात सतत अडचणी निर्माण होत. विद्यापीठ हे दरमहा मोठी विद्युत देयके भरणारा विद्युत ग्राहक आहे. विद्यापीठ परिसरात विविध महाविद्यालये, प्रयोगशाळा, संशोधन योजना, बीजोत्‍पादन प्रक्षेत्र, कृषि प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्र, उती संवर्धन केंद्र आदी महत्‍वाच्‍या आस्‍थापना व संशोध्‍न केंद्रे असुन या विविध शैक्षणिक व संशोधनात्‍मक कार्यासाठी अखंडीत वीज पुरवठयाची गरज असते. परंतु अलिकडे विद्युत वितरण कंपनीव्‍दारे भार नियमनात वाढ केल्‍याने या कार्यात व्‍यत्‍यत येत असे. विशेषता बीजोत्‍पादनात अडचणी येतात, पर्यायाने शेतक-यांना चांगले वाणाचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध करणे विद्यापीठास शक्‍य होत नसे तसेच शिक्षण व संशोधनाच्‍या कार्यात अडचणी निर्माण होत होत्‍या. विद्यापीठास अखंडीत व योग्‍य दाबाने विद्युत पुरवठा करण्‍यासाठी द्रुतगती विद्युत वाहीनी (एक्‍सप्रेस फीडर) मिळण्‍यासाठी महावितरण कंपनीस विद्यापीठाने विनंती केली. तसेच महाराष्‍ट्र राज्‍य कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा ना श्री विजयरावजी कोलते यांनी महाराष्‍ट्र राज्‍याचे उप मुख्‍यमंत्री व वित्‍त व नियोजन मंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांना विनंती केली होती.
महावितरण कंपनीने त्‍यांच्‍या अभियंत्‍या मार्फत सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार केले व‍ त्‍याच्‍या दरपत्रकाचा भरणा विद्यापीठामार्फत विद्युत कंपनीस करण्‍यात आला. त्‍यानंतर विद्युत कंपनीने हे काम हाती घेवुन पुर्ण केलेले आहे. आज राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधुन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे व जिल्‍हाधिकारी मा श्री सचिन्‍द्र प्रताप सिंह यांच्‍या हस्‍ते द्रुतगती वाहीनीची कळ दाबुन कार्यान्‍वीत करण्‍यात आली. याप्रसंगी महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता श्री सुरेश गणेशकर, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागिरे, विद्यापीठ अभियांता श्री अब्‍दुल रहीम, उपाभियंता श्री उल्‍हास खंबायतकर, महावितरण कंपनीचे उपाभियंता श्री पैठणकर, कनिष्‍ठ अभियंता श्री महेश जोशी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. याप्रसंगी अधिक्षक अभियंता श्री सुरेश गणेशकर यांना या कामाबाबतचा रूपये सात लाखाचा धनादेश मा जिल्‍हाधिकारी मा श्री सचिन्‍द्र प्रताप सिंह यांच्‍या हस्‍ते देणात आला.
या वाहीनीमुळे पहिल्‍या टप्‍प्‍यात विद्यापीठाच्‍या परिसर क्रमांक तीन मधील कृषि प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्र, कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्र, विद्यार्थी वसतीगृहे, प्रशासकीय इमारत, पाणी पुरवठा, पथदिवे इत्‍यादींना अखंडीत विद्युत पुरवडा मिळणार आहे. तसेच दुस-या टप्‍प्‍यात विद्यापीठ परीसर क्रमांक एक व दोन करीताही द्रुतगती वाहिनीची आवश्‍यता असुन त्‍यासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे.  


राष्‍ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्‍त्री यांची जयंती वसंतराव नार्इक कृषि विद्यापीठात साजरी करण्‍यात आली. या निमित्‍त विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते महात्‍मा गांधी व लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या प्रतिमेचे पुजन करण्‍यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागिरे, विद्यापीठ अभियंता श्री अब्‍दुल रहीम, उपकुलसचिव श्री जुक्‍टे, श्री गोरे यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी कुलगूरू मा डॉ किशनरावजी गोरे यांनी मार्गदर्शन करतांना म्‍हणाले कि, विद्यापीठातील कर्मचा-यांनी व अधिका-यांनी महात्‍मा गांधीच्‍या विचाराचे आचरण करावे, साधी राहाणी व उच्‍च विचार या युक्‍ती प्रमाण राहावे. आपले कार्य प्रामाणिकपणाने पार पाडुण विद्यापीठाच्‍या विकासात हातभार दयावा. 

Tuesday, October 1, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २६.० ते ३३.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २०.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ९.० ते १९.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९०.० ते ९६.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८.० ते ८५.० टक्‍के राहील.

विशेष सुचना या आठवडयात  आकाश ढगाळ राहुन तुरळक ठिकाणी हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.

शेतकरी बांधवाना कृषि सल्‍ला

कापूस

कापूस पिकावर फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी व लाल कोळी या रस शोषण करणा-या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍यांच्‍या नियंत्रणासाठी फेनप्रोपथ्रिन १० ई.सी. १० मिली किंवा बुप्रोफेझीन २५ टक्‍के १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. मागील आठवडयातील काळात झालेल्‍या पावसामुळे सखल भागातील जमिनीत कापसाची झाडे उमळत आहेत. अशा झाडांना कॉपरऑक्‍सीक्‍लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्‍डाझीम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन २५० ते ३०० मिली द्रावणाची चिबंवणी प्रति झाड केल्‍यास उमळण्‍याचे प्रमाण कमी होईल.        
तुर
तुरीचे पीक सखल भागातील जमिनीत उमळत आहेत. अशा जमिनीत वापसा येताच कोळपणी करावी. म्‍हणजे उमळण्‍याचे प्रमाण कमी होईल.
खरीप ज्‍वारी
खरीप ज्‍वारीचे पीक दाणे  भरण्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. पिकाचे पक्षापासुन संरक्षणासाठी पिकात बेगडी पटया बांधाव्‍यात.
उस
पुर्व हंगामी उसाचे लागवडीसाठी जमिनीची निवड करून मशागतीची कामे पुर्ण करून जमिन तयार करावी. पुर्व हंगामी उसाची लागवड १५ ऑक्‍टोंबर ते १५ नोव्‍हेंबर या काळात करावी.
आंबा
बागेत पाने खाणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून आल्‍यास क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
संत्रा मोसंबी
बागेत तुट आढळुण आल्‍यास तुट भरून काढावी. सिंचन सुविधा असल्‍यास बागेमध्‍ये रब्‍बीची आंतरपिके घेवु शकता बाग तणविरहीत ठेवावी.
अंजीर
३-४ खोडे ठेवून १५ ऑक्‍टोबर पर्यंत छाटणी केल्‍यास फायदेशीर आहे. अंजीरावर तांबेरा रोगाच्‍या नियंत्रणासाठी क्‍युलोरोथॅलोनील २० ग्रॅम २ ग्रॅम अधिक कार्बेन्‍डाझीम ७ ग्रॅम प्रति लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
सिताफळ
पिठया ढेकणाचा (मिलीबग) चा प्रादूर्भाव आढळल्‍यास त्‍याच्‍या नियंत्रणासाठी मॅलेथीऑन ५० टक्‍के प्रवाही १० मिली किंवा फॉस्‍पोमीडॉन ३ मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. पक्‍व फळांची काढणी करावी.
कागदीलिंबु
पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव दिसल्‍यास क्विनॉलफॉस २० मिली किंवा डायमिथोएट २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. तसेच शेंडामर दिसून आल्‍यास रोगग्रस्‍त फांदया काढून त्‍यावर बोर्डोपेस्‍ट लावावे.
फुलशेती
झेंडुवर रसशोषण करणा-या किडीचा प्रादूर्भाव आढळुण अल्‍यास डायमेथोएट १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. जिलारडीया, गुलाब इत्‍यादी फुलपिकांची लागवड करावी. 


  
सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
हवामानशास्‍त्र विभाग, वनामकृवि, परभणी
पञक क्रमांकः ४८                                              
दिनांकः ०१.१०.२०१३

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाबाबतचा सकाळ अॅग्रोवन मध्ये दि 28 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिध्द झालेला संपादकीय लेख


सेलू येथील लोक माहिती अभियानात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्याच प्रदर्शनी दालनास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद

विद्यापीठाच्‍या वतीने मांडण्‍यात आलेल्‍या दालनास परभणी जिल्‍हयाचे खासदार मा ना अॅड गणेशरावजी दुधगांवकर भेटी दिली त्‍याप्रसंगी माहिती सांगतांना श्री वैजनाथ सातपुते, श्री संजय मोरे, श्री गणेश कटारे आदी.
तांत्रिक सत्रात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार योजनेबाबत माहिती देतांना.

सेलू येथे दिनांक 26 ते 28 सप्‍टेंबर 2013 दरम्‍यान केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाच्‍या पत्र सूचना कार्यालयाच्‍या वतीने तसेच राज्‍यशासनाच्‍या विविध विभागाच्‍या मदतीने लोक माहिती अभियान संपन्‍न झाले. या लोक माहिती अभियानात आयोजीत प्रदर्शनीमध्‍ये विद्यापीठ विकसीत विविध तंत्रज्ञान व पिकांचे वाणांची माहिती असलेले सुसज्‍ज असे दालन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने मांडण्‍यात आले होते या दालनास  परभणी जिल्‍हयाचे खासदार मा ना अॅड गणेशरावजी दुधगांवकर यांच्‍यासह अनेक मान्‍यवरांनी तसेच शेतक-यानी मोठ्या संख्‍येंनी भेटी दिल्‍या. श्री वैजनाथ सातपुते, श्री संजय मोरे, श्री गणेश कटारे व श्री बालाजी भुसारे यांनी भेटी देणा-या शेतक-यांना माहिती दिली.

अभियानाच्‍या दुस-या दिवशी तांत्रीक सत्रामध्‍ये कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार योजनेबाबत माहिती दिली. अभियानाच्‍या समारोपीय कार्यक्रमात विद्यापीठाच्‍यावतीने कृषि अभियांत्रीकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी विद्यापीठाच्‍या कार्याबाबत आपल्‍या भाषणात माहिती दिली.