या मानद
पदवीसाठी दोन मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माननीय
मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेती व शेतकरी विकासासाठी अनेक
महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले व धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. स्मार्ट प्रोजेक्ट आणि
पोक्रा तसेच महाराष्ट्र कृषी एआय धोरणामुळे महाराष्ट्र आज भारतातील कृषी क्षेत्रातील
‘लाइट हाऊस स्टेट’ म्हणून उदयास येत आहे. दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे ‘महाॲग्री
एआय पॉलिसी २०२५–२०२९’ जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.याबरोबरच जलयुक्त
शिवार अभियान, शेतीमालाला हमीभाव व
बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा व सिंचन
प्रकल्पांचा विस्तार, पाणी संवर्धन, आधुनिक
तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत, अन्नप्रक्रिया व मूल्यसाखळी विकास, बाजार सुधारणा
तसेच डिजिटल शेती यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी राज्यातील शेती क्षेत्रात
सकारात्मक बदल घडवून आणले. ग्रामीण विकासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाच्या
दृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ त्यांना ‘डॉक्टर
ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करणार आहे.
तसेच परभणी
जिल्ह्यातील माळसोन्ना येथील प्रगतीशील शेतकरी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री.
श्रीरंग देवबा लाड यांचीही या ‘डॉक्टर ऑफ सायन्स’
(मानद) पदवीसाठी निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांशी त्यांचा
सातत्यपूर्ण आणि घनिष्ठ संपर्क तसेच राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त “दादा लाड
कापूस तंत्रज्ञान” हे त्यांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. सन 2002–03 पासून शेतकरी-आधारित संशोधनातून त्यांनी कापूस पिकातील उत्पादकता
घटवणाऱ्या गळफांदी (मोनोपोडियल) फांद्यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या प्रारंभीक
छाटणीची प्रभावी पद्धत विकसित केली. शेंडा खुडणी, अती घन
लागवड, ठिबक सिंचन आणि आच्छादन या तंत्रांचा एकत्रित अवलंब
करून त्यांनी कापूस पिकासाठी समग्र, वैज्ञानिक आणि नफावर्धक
तंत्रज्ञान विकसित केले. या पद्धतीमुळे उत्पादक फांद्यांकडे अन्नद्रव्यांचा पुरवठा
वाढतो, बोंडांचे वजन जास्त होते, किडींचा
प्रादुर्भाव कमी होतो, पीक कालावधी कमी होतो आणि शेतकऱ्यांचा
नफा मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच चार दशकांहून अधिक काळ लाल कांधारी या देशी गायीच्या जातीच्या संवर्धनासाठी त्यांनी उल्लेखनीय आणि व्यापक कार्य केले आहे. या
महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन विद्यापीठ त्यांना मानद ‘डॉक्टर
ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करणार आहे.
हा सन्मान
केवळ एका व्यक्तीपुरताच मर्यादित नसून,
शेती क्षेत्रात प्रगतशील विचार आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या
सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
याबरोबरच, माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी
फडणवीस यांनी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेमध्ये
प्रयोगशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘शेतकरी
शास्त्रज्ञ पुरस्कार’ देण्याची सूचना केली होती.
त्यांच्या सूचनेनुसार विद्यापीठाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून निवड
समितीच्या अहवालानुसार सर्वसाधारण गटातील नऊ आणि महिला गटातील दोन अशा एकूण अकरा शेतकऱ्यांची निवड केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या दीक्षांत समारंभात ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ प्रदान करून
गौरविण्यात येणार आहे.
‘शेतकरी शास्त्रज्ञ’ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांची
नावे
सर्वसाधारण गटातील निवड
श्री.चंद्रकांत अंबादासराव देशमुख, मु.वरपूड ता.जि. परभणी
श्री. यज्ञेश वसंतराव कात बने, मु. धनेगाव पोस्ट ढोरकीन, ता. पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
श्री. प्रताप किशनराव काळे, मु. धानोरा (काळे) पोस्ट कळगाव, ता. पूर्णा, जिल्हा
परभणी
श्री. श्रीकांत बेलेश्वर आखाडे, मु. वालसावंगी, ता. भोकरदन,
जिल्हा जालना
श्री. सुदर्शन शिवाजी जाधव, मु. गंजेवाडी, ता. तुळजापूर जिल्हा
धाराशिव
श्री. शरद बाबुराव पाटील मु. मावलगाव, ता. अहमदपूर, जिल्हा
लातूर
श्री. भगवान रामजी इंगोले, मु. पोस्ट मालेगाव, ता. अर्धापूर,
जिल्हा नांदेड
श्री. अण्णासाहेब अर्जुनराव जगताप, मु. सावरगाव, ता. माजलगाव,
जिल्हा बीड
श्री. सदाशिव वामनराव अडकिने, मु. हिंगणगाव, ता. वसमत, जिल्हा
हिंगोली
महिला शेतकरी गट
श्रीमती मीरा जनार्धन आवरगंड मु. माखणी, ता. पूर्णा, जिल्हा
परभणी
श्रीमती सुनंदा शिवाजी क्षीरसागर, मु. पांगरा, पोस्ट चितेगाव,
ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
.jpeg)