Sunday, April 13, 2025

उद्यानविद्या महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त "उत्सव लोकशाहीचा- भारतीय संविधानाचा" या विषयावर व्याख्यान संपन्न.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२५ च्या निमित्ताने "उत्सव लोकशाहीचा - भारतीय संविधानाचा" या विषयावरचे व्याख्यान दिनांक १३ एप्रिल रोजीसंपन्न झाले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. व्हि. एस. खंदारे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक श्री. नितीन सावंत हे होते. यावेळी महाविद्यालयातील डॉ. वैशाली भगत, डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. एस. आर. बरकुले, डॉ. ए. टी. दौंडे, डॉ. ए. एस. लोहकरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन  करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य माननीय डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

श्री. नितीन सावंत यांनी "उत्सव लोकशाहीचा भारतीय संविधानाचा" या विषयावरती मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने  प्रेरित केले.

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे कार्य डॉ बी. एम. कलालबंडी यांनी मांडले. कु. वैष्णवी शितळे व कु. नम्रता गिरी या विद्यार्थिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर  अतिशय उत्कृष्ट स्वरूपात विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी डॉ. एस. बी. पव्हणे, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. एस. जे. खंडागळे, डॉ. आशा सातपुते, श्रीमती शमा पठाण, श्री एजाज शेख, श्री. अभिजीत देशमुख, श्री. सतीश पुंड  इतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे सहकार्य लाभले.

सूत्रसंचालन श्री. हिमांशू पाल यांनी केले तर आभार श्री. विनायक भोसले यांनी मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद होता.