वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सिंचन पाणी व्यवस्थापन
प्रकल्पाला नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक माननीय मा.
श्री. परिमल सिंह (भा.प्र.से.) यांनी आज दिनांक ३० एप्रिल रोजी सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी बोलताना माननीय श्री. परिमल सिंह यांनी शाश्वत शेतीसाठी
पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व संचयन करणे अत्यंत गरजेचे असून, ठिबक सिंचन
पद्धतीच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा वापर हा शेतकऱ्यांसाठी परिवर्तन घडवणारा ठरू
शकतो, असे मत व्यक्त केले.
या भेटीदरम्यान नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे मृद विज्ञान
तंत्रज्ञ श्री. विजय कोळेकर, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ.
राकेश अहिरे, कृषि वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत
काळपांडे, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी तसेच ॲग्रोवनचे
जिल्हा प्रतिनिधी श्री. माणिक रासवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ही भेट विद्यापीठाच्या संशोधन व क्षेत्रीय प्रयोगांना चालना देणारी ठरली
असून, भविष्यात शाश्वत शेतीसाठी विद्यापीठ व प्रकल्प कार्यालय यांच्यातील समन्वय
अधिक बळकट होईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त
केला आहे.