महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान व कौशल्य
संपादन करण्यासाठी शिका, विधायक
कार्यासाठी संघटीत व्हा तसेच अन्याय, अत्याचारा
विरुध्द संघर्ष करा असा विचार आपणास दिला आहे. त्यांचे आर्थिक,
सामाजिक,
कृषि
विधीत क्षेत्रातील योगदान अतिशय मौलाचे होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण
घेवून त्यांनी समाज सुधारणेसाठी मौलिक कार्य केले. त्यांचे विचार आत्मसात करण्याची
गरज असल्याचे प्रतिपादन कृषि अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी
अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके यांनी केले. महाविद्यालयात आयोजित महामानव भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी
व्यासपीठावर जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे, विभाग
प्रमुख डॉ. मदन पेंडके, डॉ. गोपाळ
शिंदे, डॉ. सुमंत जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे
यांनी केले. त्यांनी जिमखाना विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती
दिली. तसेच राष्ट्रीय सेवा योजने मार्फत उदे्शिका वाचन आणि पदयात्रा काढण्यात आली.
यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला. या
प्रसंगी डॉ. संदीप पायाळ तसेच विद्यार्थी प्रतिनिधी सक्षम पंडीतकर,
कु.पार्वती,
आभा
सिंग, वैष्णवी गोरे यांनी आपले विचार
मांडले.
या वेळी डॉ. मधुकर मोरे, डॉ.
प्रमोदिनी मोरे, डॉ. रविंद्र शिंदे,
डॉ.
गजानन वसु, डॉ. अनिकेत वाईकर,
डॉ.
आश्विनी गावंडे, डॉ.
ओंकार गुप्ता आणि प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे उपस्थीत होते.
कार्यक्रम यक्षस्वी
करण्यासाठी डॉ. गजानन वसु, श्री.
मंचक डोंबे, श्री. प्रमोद राठोड तसेच कु.
प्रियंका बोरसे, निकीता जाधव,
पार्वती,
आभा
सिंग, तनुजा वाघ,
वैष्णवी गोरे, सतेज
मेटकर, राम शेंडगे,
राधेश्याम
खंटीग, अजय शिराळे,
कुनाल
गडाख, यश सहाणे इत्यादी विद्यार्थी
प्रतीनीधिनी प्ररिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिवानी डोइजड व वैष्णवी
कदम यांनी केले आणि आभार प्रदर्शन किंजल मोरे हिने केले.