नवी दिल्ली येथील स्वदेशी शोध संस्थान, मध्यप्रदेशातील इंदिरा गांधी
राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ (IGNTU) आणि इतर उच्च शिक्षण
संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ते २६ एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित
"व्हिजन २०४७ : समृद्ध आणि महान भारत" या आंतरराष्ट्रीय परिसंवादात
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना संसाधन व्यक्ती (Resource
Person) म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
या परिसंवादात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आंतरराष्ट्रीय
सहकार्य, द्वैतीय शैक्षणिक भागीदारी आणि सामाजिक-आर्थिक विकासातील बदलती भूमिका
यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी भविष्यातील धोरणात्मक आराखड्यांची गरज
अधोरेखित करत, राष्ट्रीय आकांक्षांना पूरक ठरणाऱ्या
उपाययोजनांवर प्रकाश टाकला.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे शैक्षणिक व संशोधन
क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि जागतिक विचारसरणीने परिसंवादात
उपस्थित सर्व मान्यवरांना प्रभावित केले. त्यांच्या मौलिक विचारांनी परिसंवादातील
चर्चांना अधिक समृद्धी दिली व २०४७ पर्यंत शाश्वत, सर्वसमावेशक
व समृद्ध भारत घडविण्याच्या दृष्टीकोनात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले,
अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
या आंतरराष्ट्रीय परिसंवादात भारतातील व जगभरातील अर्थशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ,
विचारवंत, खासदार, धोरणकर्ते,
निती आयोगाचे सदस्य व अन्य थिंक टँक्स यांनी सहभाग घेतला होता.
परिसंवादात भारताच्या स्वातंत्र्यशताब्दीनिमित्त स्वावलंबी, नैतिकतेच्या
मार्गाने पुढे जाणाऱ्या आणि जागतिकदृष्ट्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सखोल
विचारमंथन झाले.
युवकांचे सक्षमीकरण व रोजगार निर्मिती, भारताच्या जागतिक आर्थिक नेतृत्वाचा
विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा व जागतिक सामरिक उपस्थिती बळकट
करणे, वैज्ञानिक व तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन, भारतीय जीवनमूल्यांवर आधारित शांती व मानवकल्याण साध्य करणे, पर्यावरणीय संतुलन व शाश्वत विकास सुनिश्चित करणे आणि उच्च नैतिक
मूल्यांद्वारे जागतिक नेतृत्व करण्यावर परिसंवादात विशेष भर देण्यात आला.
या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संवादात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची उपस्थिती अत्यंत प्रेरणादायी ठरली. त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. विकास कुमार सिंह आणि आयोजन समितीने त्यांचे विशेष आभार मानले.