Tuesday, August 26, 2025

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी वाङ्मयीन स्पर्धा उपयुक्त – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयामार्फत आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव २०२५-२६ अतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. याचाच भाग म्हणून परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन विविध वाङ्मयीन (साहित्यिक) स्पर्धां यासस्वी पार पडल्या.

या स्पर्धांमध्ये तात्काळ भाषण (Extempore Speech), वक्तृत्व स्पर्धा (Elocution) आणि वादविवाद (Debate स्पर्धा) आणि प्रश्नमंजुषा (Quiz) यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपली वक्तृत्वकला, विचारमंथनाची क्षमता आणि बौद्धिक कौशल्ये प्रदर्शित केली.

या युवक महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण समारंभ दिनांक २६ ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य आणि  विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदी प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवृद्धीबरोबरच स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते. तसेच वक्तृत्वकला, विचारमंथन आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी केले असून, समारंभाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले

या स्पर्धेतील स्फूर्तिवान भाषण / तत्काळ भाषण स्पर्धा (Extempore Speech) मध्ये परभणी येथील अन्न तंत्र महाविद्यालयातील लोकेश बी. गिरसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक परभणी येथील कृषि महाविद्यालयातील  शुभांगी शुक्ला तर तृतीय क्रमांक उद्यान महाविद्यालयातील महजबीन अब्बासी यांनी मिळवला.

वक्तृत्व स्पर्धेत (Elocution) परभणी येथील कृषि महाविद्यालयातील आराध्या सिंग प्रथम, उद्यान महाविद्यालयातील वैष्णवी शितोळे द्वितीय तर सीएसएमएसएस कृषि महाविद्यालय, कंचनवाडी येथील रईस सिद्दीकी तृतीय क्रमांकावर राहिले.

वादविवाद स्पर्धेत (Debate) सीएसएमएसएस कृषि महाविद्यालय, कंचनवाडी येथील रईस सिद्दीकी व सलोनी राऊत यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक उद्याने महाविद्यालय, परभणी येथील प्रिया सिंग व महजबीन अब्बासी यांनी पटकावला. तृतीय क्रमांक राजीव गांधी फूड टेक्नॉलॉजी कॉलेज, परभणी येथील साक्षी हिवाळे व झैना शेख यांना मिळाला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत देखील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत कृषि महाविद्यालय, परभणी येथील श्रीराम हुलवाले यांनी प्रथम क्रमांक, सीएसएमएसएस कृषि महाविद्यालय, कंचनवाडीचे  अर्पित शाहू यांनी द्वितीय क्रमांक तर परभणी येथील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयातील सुमेध लोखंडे  यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष फुलारी आणि डॉ. धीरज पाथ्रीकर यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. संतोष कदम, डॉ. संतोष फुलारी आणि डॉ. बी. एस. अगरकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमात विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.