कापुस उत्पादनवाढीसाठी शेतकरी मेळावा व कृषि प्रदर्शनाचे कृषि विज्ञान केंद्रात आयोजन
या कार्यक्रमाचे
उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी
जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा माननीय श्रीमती लक्ष्मीताई अशोकराव
देशमुख या होत्या. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या
नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक माननीय
डॉ. वाय. जी. प्रसाद आणि अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य तथा प्रांत संघटन मंत्री भारतीय
किसान संघचे माननीय श्री दादा लाड हे प्रमुख अतिथी होते. कार्यक्रमासाठी संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दौलत चव्हाण, विशेष कापूस प्रकल्प योजनेचे प्रमुख डॉ. अर्जुन तायडे,
शास्त्रज्ञ डॉ. सुनील महाजन, डॉ. निळकंठ हिरेमणी, डॉ. सुहास करकुटे आदींची उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. परभणी जिल्हा प्रकल्पाच्या माध्यमातून विकसित तंत्रज्ञानाच्या आधारे कापसाच्या उत्पादकतेमध्ये चांगली प्रगती करेल अशी आशा व्यक्त केली. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांनी या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी एकत्रितपणे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच कार्य करावे. यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. विद्यापीठाचे कापूस उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवावे. कापूस उत्पादनामध्ये परभणी जिल्हा राष्ट्रीय पातळीवर अव्वल स्थानी आणण्यासाठी निर्धार करून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले.